तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।

न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥

निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली ।

अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥

जंव रसना नाहीं जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली ।

जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥

विषयाआंतील गोडपण । रसनेआंतील जाणपण ।

दोहींसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥

सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे ।

त्यासीचि रसना वश्य होये । रसअपाये न बाधिती ॥८६॥

रसनाजितांचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें ।

सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
yashawant hire

फारच छान आहे

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी