नामसाधनेची हि पथ्ये एखाद्याने काळजीपूर्वक पळून आपली नामसाधना नेटाने सुरु ठेवली तर नामसाधनेचे अनेक दिव्य अनुभव त्यास प्राप्त झाल्याशिवाय खचित राहणार नाहीत. तथापि, नामधारकानी आणखी एक महत्त्वाची गोष्ट नित लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे 'नामस्मरण' आणि 'नामोच्चारण' या दोहोतील फरक ! पुष्कळसे साधक रोज खूप जप करतात; परंतु त्यापैकी बहुतेकजण केवळ 'नामोच्चारण' करताना दिसतात. त्यांच्याकडून नामस्मरण होताच नाही ! तेव्हा प्रथम नामस्मरण आणि नामोच्चारण यात काय फरत आहे ते पाहू या. नामोच्चारण याचा अर्थ तोंडाने नामाचा केवळ उच्चार करणे असा होतो. तोंडाने राम, कृष्ण, दत्त, शिव यांचे केवळ नाम उच्चारणे म्हणजे नामोच्चारण होय. यात 'ॐ नम: शिवाय' , किंवा ' श्रीराम जय राम जय जय राम ' इ. मन्त्रजपांचाही समावेश होतो; परंतु या मंत्राजापाचा केवळ उच्चार करणे आणि नामस्मरण करणे यात खूप फरक आहे. कारण "नामस्मरण" याचा अर्थ तोंडाने नाम घेत असताना त्याच वेळी बिश्तमंत्राच्या दैवताचे स्मरणही मनात झाले पाहिजे. नामस्मरणात या शब्दातील ' स्मरण ' हा शब्द महत्त्वाचा आहे. नामोच्चारणात हे स्मरण नसते. कबीरांनी याचे वर्णन करताना म्हटले आहे; कि "माला हातात फिरते आहे, आणि जीभ मुखात फिरते आहे ; परंतु मन मात्र दशदिशांत फिरते आहे !" अश्या जपला एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो. अश्या वेळी मुखाने नामाचा उच्चार होत असला तरी मन रिकामे असल्याने ते नेहमीप्रमाणेच कुठेही भरकटत असते आणि त्यावेळी अनेक सांसारिक चिंता, विषय, इत्यादीची गर्दी मनात होते. हे मनाचे भरकटणे तसे चोवीस तासच सुरु असते. याचे कारण आपली वृत्ती मुळातच बहिर्मुख असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आपले मन ज्यात त्यात आपले नाक खुपसत असते; परंतु उपासनेचा मुल हेतू हा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे - आत्म्याकडे केंद्रीभूत करणे- हा आहे. त्याचा प्रवाह बदलाने व तो भगवंताकडे वळविणे हि महत्त्वाची गोष्ट आपल्याला साधावयाची आहे आणि केवळ नामोच्चारणाचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच संत नामदेवांनी या नामोच्चारणाला " वाचेचा गोंधळ " असे म्हटले आहे. ते म्हणतात, " नाम घेता हे वैखरी | चित्त धावे विषयावरी | नाम रुप नाही मेळ | अवघा वाचेचा गोंधळ || " यासाठीच हा वाचेचा गोंधळ न करता स्मरण्युक्त नाम घेण्याबद्दल त्यांचा आग्रह आहे. ते पुढे म्हणतात- " नवल स्मरणाची ठेव | स्मरणामाजी प्रगटे देव | एक जनार्दनी नाम | नामी प्रगटे आत्माराम || " तथापि, अगदी सुरुवातीच्या कळत नाम आणि रूप यांचा मेल साधकाला कदाचित साधता येणार नाही. बहिर्मुख मनाला एकदम उलट दिशेने वळवून अंतर्मुख करणे ती तारेवरची कसरत सर्वांनाच जमेल असे नाही, तथापि, हे न जमेल तरी साधकांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण या संदर्भात श्री ब्रम्हचैतन्यमहाराज सांगतात कि, " नाम घेणे हे महत्त्वाचे आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच ; पण ते तसे न राहिले तरी नाम घेताना रूपाचे स्मरण सुक्ष्ण रूपाने होत असतेच असते. उदाहरणार्थ एका गृहस्थाचे घरी ' राम ' नावाचा एक गाडी आहे आणि तो गृहस्थ " राम राम " असा जप करीत बसला आहे ; परंतु परंतु त्याचवेळी त्याचे लक्ष रामाच्या रुपाकडे नसून दुसरीकडेच आहे. त्याच्या मनात त्यावेळी अनेक संसारिक विषय घोळत आहेत. अशा वेळी जर त्याला एकदम विचारले, कि " तुम्ही कोणाचे नाव घेत आहात ? " तर अर्थात, " रामाचे " असेच उत्तर तो देईल : परंतु हे उत्तर देताना त्याच्या मनात ' दाशरथी राम ' हीच व्यक्ती असणार, ' राम गडी ' हि व्यक्ती अर्थातच नसणार ! याचाच अर्थ असा, कि नाम घेताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये !" श्रीमन्ममहाराजांनी प्राथमिक अवस्तेतील नामधारकांना अशा प्रकारे मोठाच दिलासा दिलेला आहे. श्रीतुकाराम महाराजांनी नामधारकांच्या या अडचणीची कल्पना असावी असे वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात कि, " नसे तरी मणी वसे | परी वाचे तरी वसो || " कारण अगोदरच नामाचे माहात्म्य पाटणे अवघड आणि ते पटले तरी आलास झटकून मुखातून रोज नाम येणे त्याहून अवघड ! अशा परिस्थितीत ते नाम जिभेवर आले आहे हे देखील काही कमी भाग्याचे नव्हे !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel