शल्यला कर्णाचा सारथी बनवण्यात आले. या दिवशी कर्णाने भीम आणि युधिष्ठिराचा पराभव केला पण कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनाशी युद्ध सुरु केले. कर्ण आणि अर्जुन यांच्यात भयंकर युद्ध झाले. कर्णाच्या रथाचे चक जमिनीत धसले आणि कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने असहाय्य अवस्थेतील कर्णाचा वाढ केला.
यानंतर मात्र कौरवांचा उत्साह पूर्णपणे हरवून गेला. त्यांचे मनोबल ढासळले. मग शल्य प्रधान बनला, परंतु त्याला देखील युधिष्ठिराने दिवस अखेर मारले.
कौरव पक्षाचे नुकसान : कर्ण, शल्य आणि दुर्योधनाचे २२ भाऊ मारले गेले.
कोण मजबूत राहिले : पांडव.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel