प्रथम दिवशी जेव्हा कृष्ण आणि अर्जुन आपल्या रथासोबत दोन्हीकडच्या सैन्याच्या मधोमध उभे होते आणि कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होता, त्याच दरम्यान भीष्म पितामहांनी देखील सर्व योद्ध्यांना सांगितले की आता युद्ध सुरु होणार आहे. या वेळी ज्या कोणा योद्ध्याला आपली भूमिका बदलायची आहे तो या निर्णयासाठी स्वतंत्र आहे की त्याने कोणाच्या बाजूने युद्ध लढावे. या घोषणेनंतर धृतराष्ट्राचा पुत्र युयुत्सु डंका वाजवत कौरवांचे दल सोडून पांडवांच्या पक्षात निघून गेला. कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवून युद्धाची घोषणा केली.
या दिवशी १०,००० सैनिकांचा मृत्यू झाला. भीमाने दुःशासनावर आक्रमण केले. अभिमन्यूने भीष्मांचे धनुष्य आणि रथाचा ध्वजदंड तोडून टाकले. पहिल्या दिवसाअखेर पांडव पक्षाला भारी नुकसानीला सामोरे जावे लागले. विराट नरेशाचे पुत्र उत्तर आणि श्वेत हे शल्य आणि भीष्म यांच्याकडून मारले गेले. भीष्मांनी त्यांच्या कित्येक सैनिकांचा वध केला.
कोण मजबूत राहिले : पहिल्या दिवशी पांडव पक्षाला नुकसान जास्त झाले आणि कौरव पक्ष मजबूत राहिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel