मनाचे श्लोक

मनाचे श्लोक ह्या आपल्या रचनेत स्वामी रामदास ह्यांनी मनावर कसे आणि कोणते संस्कार करावेत हे स्पष्ट केले आहे. काही लोक ह्याला अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहतात तर काही लोक तत्वज्ञानीक दृष्टीकोनातून वाचतात.

समर्थ रामदास स्वामी‎समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel