गणपतीने चंद्राला शाप दिला होता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

आपल्या शांत मुक्तीसाठी चंद्राने गणेशाची आराधना केली हाेती. हे चंद्राच्या तपाचे हे स्थान आहे.

चंद्राने येथे गणेशाची स्थापना केली. गणेशाने चंद्रास आपल्या मस्तकावर ह्या ठिकाणी धारण केले. हेच ते पवित्र ठिकाण गंगामसले.

महत्त्वाच्या एकवीस गणेश मंदिरांपैकी हे भालचंद्र गणेश एक महत्त्वाचे स्थान आहे. या गणेश क्षेत्रास पूर्वी भालचंद्र पूर किंवा सिद्धाश्रम असे म्हटले जायचे.

हे गणेशस्थान गोदावरी नदीच्या काठी आहे. मुंबईहून परभणीचा रेल्वे प्रवास ५५२ किलोमीटर इतका आहे.

यादरम्यान सेलू नावाचे रेल्वे स्थानक लागते तिथून २४ किलोमीटर अंतरावर गंगामसले हे गाव आहे.

औरंगाबादवरून गंगामसले बसने साडेतीन तासांचा प्रवास आहे.

त्यादरम्यान औरंगाबाद ते जेवराई ते माजलगाव आणि माजलगाव ते गंगामसले अशी बस जाते. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel