धैर्य या गुणवत्तेवर मात करणे हा कदाचित दृढनिश्चयी होण्यातला सर्वात महत्त्वपूर्ण अडथळा आहे. ज्यांच्या ठायी चांगुलपणा आहे असे व्यक्ती म्हणायचे की त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यांच्या मते ते खरोखरच इतर लोकांचे सर्वात मूल्यवान व्यक्ती आहेत. पण तितकेच ते घाबरट आहेत.

आपण प्रामाणिक असल्यास, कठोर संभाषणे नेहमीच कटू ठरतात. आपल्या बोलण्याने काय होइल? दुसरा माणूस यावर कसा प्रतिसाद देईल?? आपलं नातं त्या माणसाशी कायम पूर्वीसारखेच राहील का? हे सर्व झाल्यावर काय होइल?अश्या अनिश्चिततेमुळे भीती निर्माण होऊ शकते जी आपल्याला पक्षपात करायला भाग पडते.

हीच भीती आपल्याला ज्या गोष्टी सत्य आहेत, प्रमाणीकपणे सांगण्याची गरज आहे त्या करण्यापासून प्रतिबंधित करते. भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धैर्यशील होणे.

आपले हृद्य पिळवटून टाकणारे सत्य माहिती असताना ते न घाबरता समोर मांडणे म्हणजेच धैर्य आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असेल शिवाय आयुष्याच्या रिंगणात लढण्याची ताकद नसेल परिस्थितीशी दोन हात करणे म्हणजे धैर्य आहे. लढाईमध्ये अंगावर बाण आभाळातून पडत असतील तरीही शत्रूला सामोरे जाने म्हणजेच धैर्य आहे.

सी.एस.लुईस असे म्हणतात की, “धैर्य हा प्रत्येक इतर सद्गुणांच्या परीक्षेच्या स्थानी उच्चतम असलेला गुण आहे.”  

आपल्याला सद्गुणी व्हायचे असेल तेव्हा पहिले पाउल धैर्यानेच उचलायला हवे. प्रामाणिकपणासाठी ही धैर्य आवश्यक आहे. सचोटीसाठी धैर्य आवश्यक आहे. चारित्र्याला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. दृढनिश्चयी व्यक्तीला   धैर्य अतिशय आवश्यक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel