विक्रमार्क पुन्हा वडाच्या झाडाजवळ गेला आणि शव खांद्यावर घेऊन स्मशानाकडे निघाला. तेव्हां त्यांतील वेताळ बोर लागला. म्हणाला-"राजा, तू अगदी हटवादी दिसतो आहेस. अनिमित्राने सुद्धा आपला इट्ट सोडून कुंतीशी जमा केले. परंतु तूं आपला हट्ट सोडशील असे दिसत नाही. ऐक तुला त्याची गोष्ट सांगतो म्हणजे तुला थकवा बाटणार नाही." असे म्हणून स्वाने गोष्ट सांगण्यास सुरवात केली. एकदां कपित्थ नांवाच्या देशांत काली- वर्मा नावाचा एक क्षत्रिय योद्धा राहात असे. तो सेवा निवृत्त होऊन आपला काळ कंठीत असे. त्याचे वय सुमारे ऐशी वर्षांचे असेल. दें नगर एका डोंगरावर वसलेले होते. त्या डोंगराच्या दक्षिण टोकास कालीवर्माचा किला होता. त्याच्या पलीकडे आणखी दक्षिणेला एक मोठा सर्दक होता.

कालीकर्माच्या कुटुंबांत त्याच्या एका नातीशिवाय कोणी नव्हते. म्हणून इतक्या मोठ्या किलयांत दोषं आपल्या नोकर चाकरांसह राहात असत त्याच्या नातीचे नांव कुंती. ती लहान असतानाच तिचे आई-वडील वारले आजीहि देवलोकी निवून गेली होती. म्हणून कालीवर्मावरच तिच्या पालन पोषणाचा भार येऊन पडला होता. तिच्या बरोबरीचे घरांत कोणीच नव्हते. तिच्या सुख-दुःखात भाग घ्यावयाला कोणीच नसल्याने ती अगदी उदास असे. तिच्या या उदासीनतेकडे सुद्धा तिच्या आजोबांचे लक्ष गेले नाही. एक दिवस त्या गांवांत देवीचा उत्सव होता. कुंती त्या दिवी देवीचे दर्शन करून परत येत होती. मंदिराच्या पायऱ्या उतरून ती घराकडे निघाली होती. तेव्हां एक क्षत्रिय तरुण युवक तिला म्हणाला- "मला तुझ्याशी कांहीं तरी बोलावयाचे आहे. मी रात्री येईन." तो युवक कुंतीच्या ओळखीचा नसल्या- मुळे तिला थोडे आश्चर्य वाटले. शिवाय त्याला तिच्याशी काय बोलावयाचे असेल बानाहि ती काही अंदाज करूं शकली नाही. आपल्या विषयी कधी कोणी एबदी चौकशी केली नाही. मग एक्ढी आपुलकी दाखवि- णारा हा कोण हे जाणण्याची तिला थोडी उत्सुकता वाटली आणि म्हणूनच तिने त्याच्या विषयी आपल्या आजोबांजवळ काहादि सांगितले नाही. तो म्हातारा मोठा कडक होता. त्याची नात कुंती कोठेदि गेली की तिच्या नकळत तिच्या मागे पुढे दोघां तिघां माणसांना तो पाठतीत असे. त्या दिवशी सुद्धा त्याने दोघांतिघांना पाठविले होते. त्यातील एका जणानेही गोष्ट म्हाताऱ्याला येऊन सांगितली.

4.PNG

LE कुंती दर्शन घेऊन घरी आल्यावर आज्याने तिला सहज प्रश्न केला-" कोणी ओळखीचे भेटले होते काय!" " नाही बोबा ! मी दर्शन करून सरळ घरीच येत आहे," कुंती म्हणाली. मग देवळाजवळ कोणाशी बोलत उभी राहिली होतीस!" कालीवर्माने विचारले. कुंती किंचित गोंधळली. तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यावरून म्हातान्याला राग आला. तो महणाला-"तुला मी लहानाची मोठी केली. आपल्या वंशाची कुलमर्यादा अजून कशी नाही तुझ्या लक्षांत आली. आपले घराणे चांगले कुलशीलवान म्हणून प्रसिद्ध आहे आणि तूं मला कळविल्या शिवाय वाटेल त्या तरुणाशी बोलावयास आणि ज्याच्याशी तूं बोललीस त्याच्याशी जर तुझे लम झाले नाहीतर ती मोठीच चूक. जर तो तुझ्या योग्य असेल तर टीकच नाही, तर तुला पश्चाताप करीत असावे लागेल. कोण होता तो! कोठे राहातो! काय आहे नांव !" आजोबांचा राग पाहून कुंतीची बोबडीच बळली. अगदी घाबरून गेली तरी स्वतःला सावरून म्हणाली मला त्याच्या विषयीं कांही एक माहीत नाही आणि मी त्याच्याशी कांही वार्तालाप केला नाही." पण काही झाले तरी आता त्याच्याशीच गांठ माहे. लक्षात ठेव. त्याच्याशीच तुला लम करावे लागणार आहे. तूं जरी बोलली नाहीस तरी तो तरी बोलला ना! काय म्हणाला तो!" आज्याने विचारले. "तो म्हणाला त्याला काहीतरी बोलायचे आहे. म्हणून रात्री थोडावेळ दरवाजा उघडा ठेवायला सांगितला आहे" कुंती म्हणाली. "अस्स! मी पपतों आता पुढे काय करायचे तें.” कालीवर्मा गरजला.

त्या माणसाशी नम करणे म्हणजे आप- त्याला मोठीच शिक्षा आहे, असें कुंतीला बाटले नाही. ज्याने आस्थेने एवढी विचारणा केली आणि तिच्याकडे ज्याचे लक्ष गेलें वाच्याशी लन करण्यास लिची काहीच हरकत नव्हती. उलट तिला एक प्रकारची सुरकाच वाटत होती. त्या दिवशी संध्याकाळी कालीयर्मान शेजारच्या काही बायकांना बोलावून आणून तिला समासाठी नवयामुलीप्रमाणे सजवून तयार ठेवण्यास सांगितले. त्याने मलाव- ग्यासाठी एका पुरोहिताला बोलावून ठेविलें होतें. कुंतीच्या लयासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करून ठेविली होती. याच वेळी कपिथ नगरांत आणखी एक गोष्ट घडली. अमिमित्र नांवाचा दुसरा एक क्षत्रिय कुमार राजाकडे नोकरीला म्हणून आला होता. तो त्या गांवांत नवीनच होता. आणि एका अनोळखी माणसाकडेच राहिला होता. तो कामावरून आल्यावर रोज गांव पाहावयाला म्हणून निघत असे आणि रात्री अंधार पडल्यावरच घरी येत असे. त्या दिवशी राज्यांत बंडखोरी माजली असल्या कारणाने तेथे कोणी शख धारण केलेला माणूस दिसला तर सरकारी शिगई त्याच्यावर हल्ला करून त्याला कैद करीत असत. ज्या दिवशी कुंतीचे लम व्हावयाचे होते त्याच दिवशी निल्याप्रमाणे अमिमित्र गांवांत किरावयास गेला, पण शखबंदीची त्याला आठवण नव्हती. काळोखी रात्र होती. आकाशांत ढग आलेले होते. त्या काळोखात समोरचे कोणाला काही दिसत नव्हतें. अनिमित्र त्या अंधारात रस्ता चुकला. त्याला त्याचे घर सांपडलेच नाही. तो भटकत भटकत कालीवर्माच्या घराच्या

बाजूला आग. तशातच त्याला गस्त चालणारे पोलीस मशाली घेऊन येत असलेले दिसले. त्याच्या जवळ शखें असल्याने त्यांचा डोळा चुकवून जाण्याचा अग्निमित्राने प्रयत्न केला. शिपाई जवळ येत आहेत असे वाटल्यावरून तो एका घराच्या दाराला टेकून उभा राहिला. दाराला टेकल्या बरोबर ते आंत टकलले गेले. बरे झाले आपण आंत लपावे म्हणून तो हळूच आंत येऊन दारामार्गे लपला. तेथे असलेल्या नोरांकनी त्याला पकडून आपल्या धन्यासमोर नेऊन उभे केले, माटीवर एका मोठ्या दिवाणखान्यांत एक बृद्ध गृहस्थ एका खुर्चीवर बसला होता. स्या क्षत्रिय कुमाराला पाहून म्हातारा खूष झाला. तो कालीवर्माच होता. “ये, मी तुझीच वाट पाहात होतो. क्षात्रतेज तुझ्या तोंडावरून टपकत आहे." 'क्षमा करा. मी आपल्याला कधी पाहिलेले नाही. ओळस्वले नाही मी आपल्याला. आपण चुकीने मला कोणी दुसरा माणूस समजत असाल. माझे नांव अमिमित्र आहे." अशिमित्राने आपली ओळख दिली.

 

" होय. तू मला पाहिले नसशील पण माझ्या नातीला तूं चांगले ओळखतोस ना! तुझी इच्छा असो अथवा नसो. मी तिच्याशी तुझें लम लावून देणार आहे. भटजींना सुद्धा मी बोलावून ठेवले आहे." कालीबर्मा म्हणाला. नंतर त्याने कुंतीला बोलावून आणण्यास सांगितलें. कुंती नटूनथटून आली. पण काय अग्निमित्राला पाहताक्षणीच तिच्या चेहेन्या- बरचा आनंद एकदम मावळला. ती एकदम म्हणाली "हा नव्हें तो माणूस. हा कोणी- तरी भामटा आहे आजोबा."

"किती खोटं बोलशील ! तुमच्या बोल- प्प्यावर माझा विश्वास कसा बसाया ! कालीवर्मा, कुंतीकडे डोळे वटारून पाहिलें. "मी यांना वर्षी पाहिले नाही. यांच्याशी नाही मी बोललें सकाळी." कुंतीने सांगितले. "तो कोणीहि असू दे. मला त्याच्याशी काही करावयाचे नाही. मी बाध्याशी तुझे रसा लावून माझ्यावरची जबाबदारी दूर करणार आणि या सर्वाला कारण तूंच, मुहूर्ताच्या केळेपर्यंत ठरवा तुम्ही काय ते आणि लबाला तयार व्हा. उद्या सकाळी मुइत आहे. तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे विचार करावयास."

अग्निमित्रा ! तुला सांगतो आहे. तूं जर पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुझी घडगत नाही, एवढे रक्षात ठेव. या दक्षिणे- कडील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केलास तर शंभर फूल खोल खव्यांत पडशील, बा दरवाज्यांतून जाण्याचा प्रयत्न केलास तर शंभर तलवारी तुझ्या डोक्यावर पडतील." एवढे सांगून त्या दोघांना तेथेंच विचार करण्यास सोडून काहीवर्मा निघून गेला. 'काय चालले आहे हे माझ्या काही सुद्धा लक्षात आले नाही. मला थोडे- तरी समजावून सांग." अमिवर्मा कुंतीला म्हणाला. कुंतीने सविस्तर सर्व हकीगत सांगितली, ती ऐकून अभिवर्माला फार वाईट वाटले, 'फारच पेचांत पडली आहेस तूं. एकाशी लम करण्याची इच्छा असता तुला भट- स्याशीच स्था करावे लागत आहे. तुझ्या- वरील हे संकट राळण्यासाठी काहीहि करावयास मी तयार आहे. वेळ पडल्यास प्राण देण्यास सुद्धा तयार आहे." अमिमित्र म्हणाला. ते ऐकून कुंतीला फार वाईट वाटलें. या विचाऱ्याला उगीचच मध्ये त्रास. 66

 

पण विचार करण्याचा काहीच उपयोग नहता. "माझ्यासाठी तुम्ही आपले प्राण का देतां ! माझी सर्व हकीगत मी सांगितली आहे. माझ्याशी लम करण्यांत तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याशी लम केलेलेच बरें," कुंती म्हणाली. "जबरदस्तीनेच जर तुला माझ्याशी लम करावे लागणार असेल तर मी प्राणत्याग केलेलाच बरा आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तुझ्या सारस्त्री सुंदर मुल्मी मला मिळू शकेल ही कल्पना मला स्वांत देखील नव्हती." अग्निमित्र म्हणाला. मग तुम्ही लयाला तयार झालेलेंच बरें. जर तुम्ही प्राण दिलांत तर मला जन्मभर रडत बसावे लागेल." म्हणाली. "माझे प्राण बांचविण्यासाठी तू माझ्याशी लग्न करण्यास तयार होत आहेस. पण मी क्षत्रिय वीर आहे. मला मरणाची भीति वाटत नाही. पण मी मरणार आहे तो तुझ्याच हितासाठी. मी जिवंत असे पर्यंत तुला तुझ्या प्रियकराशी सा करता येणार नाही." अमि- मित्राने सांगितले.

 

"तुमचा निश्चय पणा होण्यापूर्वी मी तुम्हाला माझी हकीगत पुन्दा सांगते. नीट ऐका. मी अजून पर्यंत कोणावरहि प्रेम केलेले नाही किंवा त्या विषयी मी अजून विचारच केला नाही आणि आता विचार करावयाचा म्हणजे तुमच्या पासूनच मला सुरवात करावयाची आहे. तुमच्या बद्दल माझ्या मनांत श्रीति बाढू लागली आहे. अर्थातच पुढे ती प्रेमांत बदलणार. म्हणजे मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. जर तुम्ही माझ्याशी सा केले नाहीत तर मी जन्मभर अशीच राहणार आहे." कुंती म्हणाली.

 

." एबड़े होईतो पाहाट झाली. मुइच्चिा- पूर्वी सोडावेळ कालीका आला. काय केलात दोषांनी विचार झालांत समाला तयार। अग्निमित्राने 'होय' म्हणतांच कुतीने सुद्धा आपली अनुमति दर्शविली. दोपांचें ला झालें, अमिमित्र आपल्या बायकोला घेऊन गेला. गोष्ट संपविल्यावर वेताळाने विचारलें- "अगोदर नाही म्हणून नंतर अमिमिन्न समास का तयार झाला! कालीवर्माच्या भयानें। स्या दोषांत कोणी कोणाला फसविलें होते! तुला उत्तर दिलेच पाहिजे. नाहीतर परिणाम तुला माहीतच आहे. टाळाटाळ करून चालाक्याचे नाही." विक्रमार्क म्हणाला-" कोणी कोणाला भीत नव्हते. अमिमित्र क्षत्रिय बीर

 

असल्याने कोणाला हार जाणारा नव्हता. जबरदस्तीने सस करून घेण्यापेक्षा त्याला मरण जास्त पसंत होते. कुंतीलाहि आपल्या आजोबांची भीति वाटत नव्हती. दोघांनी परिस्थितीचा चांगला विचार केला होता अग्निमित्राच्या त्यागभावनेमुळे कुंतीला खरोखरीच त्याच्या विषयीं ओदा बाई लागला होता. ती नुसती बोलण्याची इच्छा दर्शविणारावर सुद्धा जर प्रेम कर्फ लागली होती तर मग प्रत्यक्ष बोलणारावर ती का नाहीं प्रेम करणार! अमिमित्राविषयी तिला खरोखरच प्रेम पाहू लागले होते. म्हणून ती सास तयार झाली. एवंच हें लग्न जबरदस्तीचे काही झाले नाही." अशा तम्हेनें राजाचे मौन भंग होतांच वेताळ 'शवासह नाहीसा झाला आणि वडाच्या शाडावर पूर्ववत् लटकू लागला. (कल्पित)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel