श्री कपालेश्वर महादेवाच्या महिमेचे साक्षी स्वतः महादेव आहेत. श्री कपालेश्वर महादेवाची आराधना करून स्वतः महादेवाच्या ब्रम्ह हत्या दोषाचे निवारण झाले होते.
पौराणिक कथांनुसार त्रेता युगात एकदा ब्रम्हदेव यज्ञ करत होते. हा यज्ञ महाकाल वनात केला जात होता. तिथे ब्राम्हण बसलेले होते आणि आहुती देत होते. तेव्हाच भगवान शंकर भस्म धारण करून कपाल हातात धरून विकृत रुपात तिथे प्रकट झाले. त्यांना या रुपात पाहून ब्राम्हण अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांचा अपमान केला. तेव्हा कापालिक वेश धारण केलेल्या भगवान शंकरांनी सांगितले की ब्रम्ह हत्येचे पाप नष्ट करण्यासाठी मी कपाल धारण करण्याचे व्रत घेतले आहे. हे व्रत पूर्ण झाल्यानंतर मला सद्गती प्राप्त होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel