(अंजली पळून गेल्याचे भयंकर पडसाद प्रगतीच्या आयुष्यावर उमटायला सुरू होतात. एकही व्यक्ती तिला घालून-पाडून बोलायचं सोडत नसते. खूप विचार करून प्रगती देखील गाव सोडण्याचा निर्णय घेते. आणि हा विचार ती अनिकेत समोर मांडते.)

प्रगती:- मला वाटतं हीच योग्य वेळ आहे. 

अनिकेत:- कशाची? मला नीट सांग जरा प्रगती....

प्रगती:- आपण गाव सोडून जाऊ या ना अनिकेत. 

अनिकेत:-अगं एका घटनेचे पडसाद पाहिलेस ना तू तरी...

प्रगती:- पाहिलेत म्हणूनच म्हणतीये.... 

अनिकेत:- तुझा निर्णय नक्की ठाम झालयं का? 

प्रगती:- हो. माझा निर्णय पूर्णपणे झाला आहे. 

अनिकेत:- ठीक आहे सोबत गाव सोडूयात.

प्रगती:- माझ्याजवळ आपल्याला एक महिना पुरतील एवढे पैसे आहेत.

अनिकेत:- माझ्या जवळही आहेत. आपण नव्याने आयुष्य सुरू करू. 

प्रगती:- हो. जे केवळ आपलं आणि आपल्याच आयुष्य असेल.

अनिकेत:- हो पण पुढची प्लॅनिंग करायला मला चार पाच दिवस वेळ दे. नंतर आपण निघू. 

प्रगती:- हो. चालेल.
( हा प्रसंग इथेच संपतो.)
 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel