श्री अप्सरेश्वर महादेवाची कथा महाकाल वनाची महती आणि अप्सरांनी केलेली शंकराची आराधना चित्रित करते. अप्सरांनी पूजन केलेल्या या शिवलीन्गातर्फे अप्सरा रंभा हिचा शाप दोष दूर झाला होता. पौराणिक कथांनुसार एकदा नंदन नावाच्या वनात देवराज इंद्र आपल्या सभेत दिव्य सिंहासनावर विराजमान होऊन नृत्य बघत होता. इंद्राने तिथे रंभा या अप्सरेला चित्त विचलित झाल्यामुळे लय – तालात चुकताना पहिले. तेव्हा इंद्र खूप क्रोधीत झाला आणि म्हणाला की चूक करणे ही मानवाची आहे, परंतु इथे देवलोकात ही गोष्ट क्षमा करण्याजोगी नाही. तेव्हा त्याने रंभाला कांतिहीन होण्याचं शाप देऊन पृथ्वीवर पाठवले. इंद्राच्या शापाच्या प्रभावाने रंभा आपली शोभा हरवून पृथ्वीवर येऊन पडली आणि दुःखी होऊन रडू लागली. रंभा दुःखी झालेली पाहून तिच्या सख्या देखील आकाशातून तिच्याजवळ आल्या आणि शोक करू लागल्या.